Wire Fencing Scheme: काटेरी तार कुंपणासाठी शेतकऱ्यांना मिळणार ९०% अनुदान; योजनेचा आजच लाभ घ्या!

On: Saturday, June 21, 2025

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Wire Fencing Scheme Maharashtra: महाराष्ट्रातील शेतकरी दिवसेंदिवस नवनवीन संकटांना सामोरे जात आहेत. पावसाची अनिश्चितता, सतत बदलणारे हवामान, आर्थिक अडचणी आणि आता वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. विशेषतः रानडुक्कर, नीलगाय, हरणे, माकड यांसारख्या प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान होते. अशा कठीण परिस्थितीत शासनाने ‘काटेरी तार कुंपण योजना’ सुरू करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

Wire Fencing Scheme in Maharashtra offering 90% subsidy to protect crops from wild animals

ही योजना नेमकी काय आहे?

पिकांचे नुकसान टाळण्यासाठी, राज्य शासनाची काटेरी तार कुंपण योजना (Wire Fencing Scheme) ही शेतकऱ्यांसाठी फार उपयोगी ठरत आहे. या योजने अंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतीभोवती तारांचे कुंपण करू शकतात, जेणेकरून वन्य प्राणी शेतात घुसू शकणार नाहीत. या योजनेमुळे केवळ पिकांचे संरक्षण होत नाही, तर शेतकऱ्याचा मेहनत, वेळ आणि खर्चही वाचतो. शासन या योजनेसाठी शेतकऱ्याला निम्म्याहून अधिक आर्थिक सहाय्य देते.

Wire Fencing Scheme साठी शासनाकडून मिळणारे आर्थिक साहाय्य

या योजनेअंतर्गत, सरकार शेतकऱ्याला ९० टक्क्यांपर्यंत अनुदान देते. म्हणजे जर पूर्ण कुंपणाचा खर्च ५०,००० रुपये असेल, तर शेतकऱ्याला केवळ ५,००० रुपये भरावे लागतात. उर्वरित खर्च शासनाकडून दिला जातो. या योजनेत शेतकऱ्याला सुमारे दोन क्विंटल काटेरी तार, सुमारे तीस लोखंडी खांब आणि अन्य आवश्यक साहित्य मिळते. हे सर्व साहित्य शासकीय दराने पुरवले जाते, त्यामुळे शेतकऱ्याचा आर्थिक भार अधिकच हलका होतो.

Wire Fencing Scheme योजनेमागील उद्देश आणि फायदे

ही योजना फक्त आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही, तर तिच्यामागे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांपासून संरक्षण देणे, उत्पादनात वाढ घडवून आणणे, शेती फायदेशीर बनवणे आणि रात्रपाळीपासून सुटका करणे, हे या योजनेमागील प्रमुख हेतू आहेत. कुंपण असल्यामुळे वन्य प्राणी शेतात शिरण्याचा धोका कमी होतो, त्यामुळे उत्पादन स्थिर राहते. हे शेतकऱ्याच्या आर्थिक आणि मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते.

पात्रता आणि अटी काय आहेत?

Wire Fencing Scheme या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटींच पालन करण आवश्यक आहे. सर्वप्रथम, संबंधित शेतजमिनीवर कोणताही कायदेशीर वाद नसावा. ती जमीन अतिक्रमणमुक्त असावी आणि त्या परिसरात वन्य प्राण्यांची उपस्थिती असलेला पुरावा आवश्यक आहे. ग्रामविकास समिती किंवा वन समितीकडून या बाबतीत प्रमाणपत्र मिळण आवश्यक आहे. तसेच, कुंपणामुळे प्राण्यांच्या नैसर्गिक मार्गात अडथळा निर्माण होणार नाही, याची देखील काळजी घेतली जाते.

अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रं

शेतकऱ्यांनी Wire Fencing Scheme ही योजना घेण्यासाठी त्यांच्या तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात जाऊन अर्ज भरावा लागतो. अर्ज करताना ७/१२ उतारा, गाव नमुना ८-अ, आधार कार्ड, ग्रामपंचायतीचा दाखला, वन्य प्राण्यांच्या उपस्थितीचा दाखला आणि जर जमीन सहमालकीची असेल, तर सहमालकांचे हक्कपत्र अशी आवश्यक कागदपत्र सादर करावी लागतात. स्थानिक अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर अर्जाला मंजुरी दिली जाते.

शेतकऱ्यांचे अनुभव आणि यशोगाथा

राज्यभरात अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे आणि त्यांच्या अनुभवातून या योजनेचे यश सिद्ध झाले आहे. अनेक शेतकरी सांगतात की याआधी रानडुक्कर व नीलगाय यांच्या हल्ल्यांमुळे पिकांच मोठ नुकसान होत असे. पण कुंपण बसवल्यानंतर हे नुकसान जवळपास शून्यावर आल. आज ते अधिक आत्मविश्वासाने शेती करत आहेत आणि उत्पादनातही वाढ झाली आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी मिळालेल्या उत्पन्नातून, आधुनिक शेती पद्धतीही स्वीकारल्या आहेत.

शेवटी – ही योजना का आवश्यक आहे?

काटेरी तार कुंपण योजना ही आजच्या काळात अत्यंत गरजेची आहे. वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी, शेतकऱ्यांचं मनोधैर्य टिकवून ठेवण्यासाठी आणि शेती फायदेशीर बनवण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरते. शासनाने दिलेल ९०% अनुदान हे शेतकऱ्यांसाठी मोठ बळ आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याने ही संधी वाया न घालवता, लवकरात लवकर अर्ज करून स्वतःच्या शेतीच संरक्षण करण गरजेच आहे.

महत्वाची सूचना: या लेखात दिलेली माहिती विविध ऑनलाइन स्रोतांवरून घेतलेली आहे, वाचकांना विनंती आहे की, कोणत्याही निर्णयापूर्वी योग्य ती तपासणी करावी आणि सावधगिरी बाळगावी. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. कोणतेही महत्वाचे निर्णय घेण्यापूर्वी संबंधित शासकीय कार्यालयाकडे संपर्क करणे योग्य ठरेल.

Photo of author

लेखकाबद्दल

साहिल घिवे

मागील दहा वर्षांपासून डिजिटल सेवा क्षेत्रात कार्यरत असून, एक अधिकृत Mahaonline VLE आणि अनुभवी Aadhaar Supervisor म्हणून हजारो नागरिकांना ऑनलाईन सेवा आणि आधार संबंधित मदत पुरवली आहे. स्वतःचे Mahaonline केंद्र चंद्रपूर जिल्ह्यातील, गोंडपिपरी शहरात असून, केंद्राच्या माध्यमातून विविध शासकीय योजना, दाखले, पॅन कार्ड, आधार अपडेट, व इतर अनेक सेवा लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. आणखी वाचा

Leave a Comment

WhatsApp Icon
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करा !