Ration Card E-KYC Deadline: ३० जून २०२५ अंतिम तारीख! तुमच रेशन कार्ड चालू ठेवायचंय? मग हे वाचा!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Ration Card E-KYC Deadline: राज्यातले लाखो रेशन कार्डधारक अजूनही E-KYC प्रक्रिया पूर्ण करत नाहीत, हे लक्षात घेता सरकारन आता थोडस कठोर पाऊल उचलल आहे. कारण ३० जून २०२५ ही अंतिम तारीख ठरवून सरकारन स्पष्ट केल आहे की, त्यानंतर कोणीही E-KYC केल नसेल तर त्यांना मोफत राशन देण थांबवण्यात येईल.

Ration Card E-KYC Deadline warning issued by government - Mandatory for free ration

काहींना वाटेल, “ही फक्त एक औपचारिकता असेल, नंतर करू,” पण या वेळेस ते चालणार नाही. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली नाही, तर कार्डच निष्क्रिय होऊ शकत आणि तुमच्या घरातला धान्याचा हक्क थेट बुडू शकतो. फार उशीर न करता ही प्रक्रिया आत्ताच पूर्ण करा, म्हणजे पुढीलही राशन तुम्हाला अडथळ्याशिवाय मिळत राहील.

Table of Contents

E-KYC म्हणजे नेमक काय असत?

सोप्या भाषेत सांगायच झाल, तर E-KYC ही तुमची डिजिटल ओळख पडताळणी करण्याची एक पद्धत आहे. तुमच्या नावाचा, पत्त्याचा, वयाचा, लिंगाचा आणि बायोमेट्रिक माहितीचा आधार घेतला जातो आणि सरकारी सेवांमध्ये तुमची ओळख पटवली जाते.

E-KYC फक्त रेशन कार्डसाठीच नाही, तर बँक खाती उघडताना, UPI सुरू करताना, किंवा सरकारी योजना मिळवण्यासाठीही आवश्यक असते. एकदा E-KYC केल्यावर ती माहिती बँक, योजना, आणि इतर सरकारी सेवांसाठीही उपयुक्त ठरते.

फक्त आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लागतो – इतर काही नाही!

ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे. तुमच्याकडे फक्त आधार कार्ड आणि त्याच्याशी लिंक असलेला मोबाईल नंबर असला की, पुरेसे आहे. याशिवाय कोणतेही कागदपत्र किंवा पुरावे लागत नाहीत.

अर्थात, आधार कार्डमध्ये जर तुमच नाव चुकीच असेल, जुना मोबाईल नंबर लिंक असेल, किंवा पत्ता बदललेला असेल, तर आधी ते अपडेट करून मगच ही प्रक्रिया करा.

मोबाईल नंबर चालू नसेल, तर OTP येणारच नाही!

हे लक्षात ठेवा – E-KYC करताना मोबाईलवर OTP येतो. तोच टाकून तुमची ओळख पडताळली जाते. जर तुमचा मोबाईल नंबरच बंद असेल, किंवा आधारमध्ये जुना नंबर असेल, तर ही प्रक्रिया पूर्णच होणार नाही.

त्यामुळे आधी UIDAI च्या वेबसाइटवर जाऊन तुमचा आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर तपासा आणि गरज असल्यास अपडेट करा.

सरकारने अचानक ही सक्ती का केली?

सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये अनेक बनावट रेशन कार्ड, डुप्लिकेट नाव, मृत व्यक्तींच्या नावावर लाभ घेणारे असे प्रकार वाढले होते. यामुळे खऱ्या गरजूंना त्याचा लाभ मिळत नव्हता. सरकारने या गैरवापरावर आळा घालण्यासाठी, रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचा निर्णय घेतला आणि आता E-KYC सक्ती केली आहे.

वेळेवर E-KYC न केल्यास काय होईल?

जर ही प्रक्रिया केवळ टाळली, तर पुढील परिणाम होऊ शकतात:

  • रेशन कार्ड थेट निष्क्रिय केल जाईल
  • मोफत अन्नधान्य मिळण थांबेल
  • इतर योजनांचाही लाभ घेता येणार नाही
  • सरकारच्या यादीतून तुमच नाव अपात्र म्हणून हटवल जाईल.

म्हणजे, एका लहानशा टप्प्यात दुर्लक्ष केल्यामुळे, घरगुती शिधा, अनुदान, किंवा अन्न सुरक्षा योजना सारख्या सुविधा गमवाव्या लागतात.

घरबसल्या ही प्रक्रिया करता येते – हे फारस लोकांना ठाऊक नाही!

सध्या सरकारने यासाठी दोन अधिकृत अ‍ॅप्स उपलब्ध करून दिले आहेत, जे Google Play Store वर मिळतात.

MERA E-KYC आणि Aadhaar Face RD ही दोन अ‍ॅप्स प्ले स्टोअरवर सुलभपणे उपलब्ध आहेत. ती डाऊनलोड करून प्रक्रिया सुरू करता येते. त्यानंतर, लोकेशन निवडून, आधार क्रमांक टाका, कॅप्चा भरा, आलेला OTP नोंदवा, फेस स्कॅन करा आणि सबमिट करा. अवघ्या १० मिनिटांत तुमची प्रक्रिया पूर्ण होईल!

वेबसाइटवरूनही हे शक्य आहे, पण सर्व राज्यांत नाही

तुम्ही तुमच्या राज्याच्या सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) वेबसाइटवर (उदा. महाराष्ट्रासाठी mahafood.gov.in) जाऊन देखील E-KYC करू शकता.

हे लक्षात घेण महत्त्वाच आहे की, काही राज्यांमध्ये ही सुविधा केवळ ऑफलाइनच उपलब्ध आहे. काही ठिकाणी फक्त ऑफलाइन प्रक्रियाच उपलब्ध आहे. त्यामुळे तुमच्या जिल्ह्याच्या PDS ऑफिस, ग्रामपंचायत किंवा स्थानिक CSC केंद्रात चौकशी करावी लागेल.

काही गोष्टी विसरू नका – नाहीतर KYC अर्धवट राहील

  • आधार कार्डवरील माहिती आणि रेशन कार्डवरील माहिती जुळलेली हवी
  • चेहरा स्कॅन करताना प्रकाश चांगला असावा
  • OTP वेळ घेऊन येतो – थोड थांबा
  • जर अ‍ॅप व्यवस्थित कार्य करत नसेल, तर Play Store वर जाऊन त्या अ‍ॅप ला अपडेट करा.
  • मोबाईल डेटा आणि नेटवर्क नीट चालतय का तपासा

अडचण आली तर मदतीसाठी कुठे जाव?

जर काही अडचण येत असेल, तर गावातील CSC केंद्र, जनसेवा केंद्र, PDS कार्यालय, किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात जाऊन मदत घ्या. या केंद्रांवर काम करणारे कर्मचारी तुम्हाला प्रत्येक टप्प्यात मार्गदर्शन करतात आणि प्रक्रिया सोपी करतात.

शेवटचं सांगायचं म्हणजे…

३० जून २०२५ ही तारीख (Ration Card E-KYC Deadline) केवळ एक डेडलाइन नाही, ती तुमच्या मोफत रेशन हक्काची शेवटची संधी आहे.

शेवटच्या क्षणी गडबड होऊ शकते, OTP वेळेवर न येण, वेबसाइट स्लो होण, हे सर्व नेहमी होत. म्हणून आजच ही प्रक्रिया पूर्ण करा. कारण एक छोटा प्रयत्न – तुमच कुटुंब वर्षभर मोफत धान्याच्या हक्कापासून वंचित राहणार नाही.

FAQs: वारंवार विचारले जाणारे प्रश्न

माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला E-KYC करण आवश्यक आहे का?

होय, रेशन कार्डवर नमूद असलेल्या प्रत्येक सदस्याला, अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, त्यांचे स्वतःचे E-KYC करण बंधनकारक आहे.

मी माझे E-KYC पूर्ण केले आहे की नाही हे कसे तपासायचे?

तुम्ही तुमच्या स्थानिक रेशन दुकानात (PDS दुकान), CSC केंद्रामध्ये (जनसेवा केंद्र), किंवा तुमच्या जिल्ह्याच्या पुरवठा कार्यालयात जाऊन तुमच्या रेशन कार्डची स्थिती विचारू शकता.

माझ्या आधार कार्डवर जुना पत्ता किंवा चुकीचे नाव असल्यास काय करावे?

तुमचा आधार कार्डातील तपशील – नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक, E-KYC करण्यापूर्वी अचूक आणि अद्ययावत असण फार महत्त्वाच आहे. जर काही चूक असेल किंवा जुना पत्ता असेल, तर आधी UIDAI च्या वेबसाइटवर किंवा आधार सेवा केंद्रात जाऊन ती माहिती दुरुस्त करून घ्या. अद्ययावत आधार कार्ड मिळाल्यावरच E-KYC प्रक्रिया पूर्ण करा.

माझा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक नसेल तर E-KYC कसं करायचं?

E-KYC साठी आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण OTP त्याच नंबरवर येतो. जर आधारमध्ये मोबाईल नंबर अपडेट नसेल किंवा बदललेला असेल, तर जवळच्या अधिकृत केंद्रात भेट देऊन लगेच तो दुरुस्त करून घ्या.

E-KYC पूर्ण करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२५ ही नक्कीच पाळली जाईल का, की ती पुढे ढकलली जाऊ शकते?

सरकारने ही अंतिम तारीख (३० जून २०२५) निश्चित केली आहे आणि स्पष्ट केलं आहे की त्यानंतर E-KYC न केलेल्यांना मोफत रेशन मिळणार नाही. जरी भूतकाळात काहीवेळा अशा तारखा पुढे ढकलल्या गेल्या असल्या तरी, या वेळेस सरकार कठोर भूमिका घेत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे अंतिम क्षणाची वाट न पाहता लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

Photo of author

Sahil Ghive

मागील दहा वर्षांपासून डिजिटल सेवा क्षेत्रात कार्यरत असून, एक अधिकृत Mahaonline VLE आणि अनुभवी Aadhaar Supervisor म्हणून हजारो नागरिकांना ऑनलाईन सेवा आणि आधार संबंधित मदत पुरवली आहे.स्वतःचे Mahaonline केंद्र चंद्रपूर जिल्ह्यातील, गोंडपिपरी शहरात असून, केंद्राच्या माध्यमातून विविध शासकीय योजना, दाखले, पॅन कार्ड, आधार अपडेट, व इतर अनेक सेवा लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत.अधिकृत Mahaonline VLE असल्यामुळे त्यांचे सेतु केंद्र आणि इतर माहिती Mahaonline च्या अधिकृत वेबसाइटवर आहे, त्यांनी मिळवलेल्या अनुभवामुळेच नागरिकांचा त्यांच्यावर विश्वास आहे.सरकारी योजना, GR (शासन निर्णय), आणि डिजिटल सेवा याबाबत मार्गदर्शक लेख लिहून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, माहिती लोकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवणे आणि डिजिटल भारतात प्रत्येक नागरिकाला सक्षम करणे हा हेतू आहे.

Leave a Comment

WhatsApp Icon
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करा !