PM Kisan Mandhan Yojana: जग बदलतय, पण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही तिथच आहेत. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांसाठी वृद्धावस्थेत आर्थिक मदत मिळावी, यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान मानधन योजना सुरु केली.

किसान मानधन योजना (PM Kisan Mandhan Yojana) काय आहे
प्रधानमंत्री किसान मानधन योजना अशा शेतकऱ्यांसाठी आहे, जे आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहेत आणि वृद्धावस्थेत आधार हवा असतो. ६० वर्षे वय झाल्यावर सरकारतर्फे दर महिन्याला ३,००० रुपये पेन्शन दिल जात. म्हणजेच वर्षभरात थेट बँक खात्यात ३६,००० रुपये जमा होतात.
किसान मानधन (PM Kisan Mandhan Yojana) योजनेची पार्श्वभूमी
प्रधानमंत्री किसान मानधन योजना १२ सप्टेंबर २०१९ रोजी सुरू झाली. त्याआधी अनेक शेतकरी वृद्धावस्थेत उत्पन्नाविना जगत होते. पेन्शन मिळावी म्हणून अनेक सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या. हे दृश्य बदलाव, म्हणूनच ही योजना राबवण्यात आली. सरकारचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक साक्षरतेकडे आणि सुरक्षिततेकडे नेण.
पात्रता
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत. त्या अगदी सामान्य आणि सोप्या आहेत:
- अर्जदाराचं वय १८ ते ४० वर्षांदरम्यान असावं.
- त्याच्याकडे २ हेक्टर (सुमारे ५ एकर) पर्यंत शेती असावी.
- तो कोणत्याही इतर पेन्शन योजनेचा लाभार्थी नसावा (जसं की EPFO, ESIC, NPS वगैरे).
- तो भारतीय नागरिक असावा आणि शेती त्याच्याच नावावर असावी.
अर्जाची प्रक्रिया
नोंदणीसाठी दोन पर्याय आहेत:
- ऑनलाइन अर्ज: अधिकृत वेबसाइट www.pmkmy.gov.in किंवा www.pmkisan.gov.in वर जाऊन अर्ज भरता येतो.
- CSC केंद्रावर नोंदणी: गावातले जवळचे कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) हे नोंदणीसाठी मदत करतात. तिथ आधार कार्ड, बँक खाते आणि जमीन कागद दाखवून फॉर्म भरता येतो.
जर कोणी आधीपासून PM-KISAN योजनेचा लाभार्थी असेल, तर त्याचे अनेक कागदपत्र आधीच सरकारकडे उपलब्ध असतात. त्यामुळे प्रक्रियाही जलद होते.
कसे भराल प्रीमियम?
प्रीमियम म्हणजे दर महिन्याला सरकारकडे जमा होणारी एक लहानशी रक्कम, ही वयानुसार ठरते:
- १८ वर्षे: ₹५५ प्रति महिना
- ३० वर्षे: ₹१०५ प्रति महिना
- ४० वर्षे: ₹२०० प्रति महिना
तुमच वय जस वाढत, तसच प्रीमियम थोडा वाढतो. पण त्याचा मोबदला तुम्हाला साठीनंतर पेन्शनच्या रूपात मिळतो.
PM-KISAN लाभार्थींसाठी बोनस फायदे
जे शेतकरी आधीपासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा फायदा घेत आहेत, त्यांच्या ₹६,००० वार्षिक मदतीतून प्रीमियम थेट वजा केला जाऊ शकतो. यामुळे तुमच्या खिशातून काहीही खर्च न होता तुम्ही पेन्शन योजनेत सहभागी होऊ शकता.
मृत्यूनंतर पती/पत्नीला देखील मिळते पेन्शन
प्रधानमंत्री किसान मानधन योजना इथेच थांबत नाही. जर लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या पती किंवा पत्नीला ₹१,५०० मासिक पेन्शन सुरू राहते. यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबाला एक प्रकारचा आधार मिळतो.
फायदे संक्षेपात समजून घ्या
- वयाच्या साठीनंतर दरमहा ₹३,००० पेन्शन
- सरकारकडून हपत्यात समान सहभाग
- सोप्या अटी आणि प्रक्रिया
- मृत्यूनंतर जोडीदाराला अर्धी पेन्शन
- PM-KISAN लाभार्थींसाठी प्रीमियम वजा करून सोपा सहभाग
ही योजना शेतकऱ्यांच्या भविष्याचा आधार आहे. गरज आहे फक्त योग्य माहिती मिळवून योग्य वेळी अर्ज करण्याची. कारण वृद्धावस्थेत जर आर्थिक स्वतंत्रता नसेल, तर कष्टाच आयुष्य वाऱ्यावर उडून जात.
तुमच्या घरात किंवा शेजारच्या कोणत्याही शेतकऱ्याला ही माहिती पोहोचवा, धन्यवाद!
FAQ
प्रधानमंत्री किसान मानधन योजना म्हणजे नेमकी काय?
ही एक पेन्शन योजना आहे जिच्यामार्फत लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना ६० वर्षांनंतर दर महिन्याला ३,००० रुपये पेन्शन दिल जात.
या योजनेत कोण पात्र आहेत?
ज्यांच वय १८ ते ४० वर्षांदरम्यान आहे आणि ज्यांच्याकडे २ हेक्टरपर्यंत शेती आहे, असे लहान किंवा सीमांत शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.
योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
शेतकरी www.pmkmy.gov.in या वेबसाइटवर जाऊन किंवा जवळच्या CSC (Common Service Center) केंद्रात जाऊन नोंदणी करू शकतात.
पेन्शन कधीपासून सुरू होते?
जेव्हा शेतकरी ६० वर्षे पूर्ण करतो, तेव्हापासून त्याच्या बँक खात्यात दरमहा ३,००० रुपये जमा होतात.
जर लाभार्थ्याचा मृत्यू झाला, तर पेन्शन थांबते का?
नाही. लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पती/पत्नीला १,५०० रुपये मासिक पेन्शन मिळते.