PM Kaushal Vikas Yojana 2025: सरकारी प्रमाणपत्रासह मोफत प्रशिक्षण – अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या!

On: Wednesday, July 2, 2025

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

PM Kaushal Vikas Yojana 2025: आज देशात बेरोजगारीच प्रमाण वाढत चालल आहे. यामागच एक महत्त्वाच कारण म्हणजे, अनेक तरुणांच शिक्षण अर्धवट राहण. शिक्षण पूर्ण न झाल्यान त्यांना चांगल्या नोकऱ्यांपासून वंचित राहाव लागत. अनेक वेळा आर्थिक अडचणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या, यामुळे तरुणांना शिक्षण सोडाव लागत. अशा परिस्थितीत, केंद्र सरकारन सुरू केलेली प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY) ही एक आशेची किरण ठरत आहे.

PM Kaushal Vikas Yojana 2025 free government skill program in India

कोणत्याही शुल्काविना मिळणार व्यावसायिक प्रशिक्षण

PM Kaushal Vikas Yojana 2025 अंतर्गत तरुणांना ३ महिने, ६ महिने किंवा १ वर्षाच्या कालावधीत, व्यावसायिक प्रशिक्षण दिल जाते. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, प्रशिक्षणार्थींना एक मान्यताप्राप्त प्रमाणपत्र दिल जात, जे संपूर्ण भारतात नोकरी किंवा व्यवसायासाठी वैध ठरत.

आजपर्यंत हजारो तरुणांनी या योजनेंतर्गत प्रशिक्षण घेऊन, स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे किंवा चांगल्या ठिकाणी नोकरी मिळवली आहे.

सरकारची विशेष तयारी

या योजनेचा अधिकाधिक तरुणांपर्यंत लाभ पोहोचावा, यासाठी सरकारन दूरसंचार कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. मोबाईल संदेशांच्या माध्यमातून योजनेची माहिती गावागावात पोहोचवली जाते. प्रशिक्षणासाठी आर्थिक अडचणी येऊ नयेत, म्हणून गरजूंना कर्ज स्वरूपात सहाय्य उपलब्ध करून दिल जात.

ही योजना केंद्र सरकारच्या अखत्यारीत असून, तिचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील बेरोजगार तरुणांना कौशल्य आधारित रोजगारासाठी तयार करण.

PMKVY २०२५ योजनेचे फायदे – PM Kaushal Vikas Yojana 2025 Benefits

PM Kaushal Vikas Yojana 2025 या योजनेत, प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असत. साधारणतः ३०० तासांचा अभ्यासक्रम असून, प्रशिक्षण घेत असतानाच सरकारकडून ८,००० रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मिळणार प्रमाणपत्र देशभरात मान्य असत, त्यामुळे त्याचा उपयोग नोकरी मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी करता येतो.

अनेक प्रशिक्षण केंद्रांमधून केवळ तांत्रिकच नाही, तर संवादकौशल्य, वेळेच व्यवस्थापन, आणि टीमवर्क यासारख्या बाबींचाही समावेश अभ्यासक्रमात केला जातो.

या योजनेत सहभागी होण्यासाठी काय आवश्यक आहे?

या योजनेत अर्ज करण्यासाठी, उमेदवार भारतीय असावा आणि त्याचे वय १५ ते ४५ वर्षांदरम्यान असण आवश्यक आहे. शिक्षणासाठी किमान १०वी उत्तीर्ण असण आवश्यक आहे. तसेच, उमेदवार हा सध्या बेरोजगार असावा किंवा त्याने शिक्षण अर्धवट सोडल असाव.

हिंदी आणि इंग्रजी या भाषांच मूलभूत ज्ञान असण आवश्यक आहे. यापूर्वी काही कौशल्य शिकलेल असेल, तरी उमेदवाराला या प्रशिक्षण योजनेत सहभागी होण्याची संधी मिळते.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

PM Kaushal Vikas Yojana 2025 साठी नोंदणी करताना उमेदवाराकडे आधार कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, वयाचा पुरावा आणि बँक खाते असणे आवश्यक आहे. याशिवाय, दोन पासपोर्ट साईज फोटो आणि सध्या वापरत असलेला मोबाईल क्रमांकही आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया (PMKVY Online Registration)

नोंदणीसाठी अधिकृत संकेतस्थळ https://www.skillindiadigital.gov.in/home ला भेट द्या, त्यानंतर “Learner/Participant” हा पर्याय निवडा, आवश्यक ती माहिती भरून घ्या.

    शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा…

    सरकारकडून दिल्या जाणाऱ्या या संधीचा लाभ घ्यावा. शिक्षण काही कारणास्तव अर्धवट राहिल असेल तरी, कौशल्याच्या आधारे स्वतःच भविष्य घडवता येत. PM Kaushal Vikas Yojana 2025 ही केवळ एक योजना नाही, तर स्वतःला पुन्हा एकदा उभ करण्याची संधी आहे.

    FAQs: वारंवार विचारले जाणारे प्रश्न

    प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना म्हणजे काय आहे?

    प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत, देशातील तरुणांना मोफत व्यावसायिक आणि तांत्रिक प्रशिक्षण देणे. तसेच, विविध अभ्यासक्रम शिकवले जातात आणि प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मान्यताप्राप्त प्रमाणपत्र दिल जात.

    प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेत मिळणारे प्रशिक्षण खरच मोफत असत का?

    होय, PM Kaushal Vikas Yojana 2025 या योजनेअंतर्गत दिल जाणार प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असत. उमेदवारांकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही.

    प्रधानमंत्री कौशल्य विकास या योजनेसाठी पात्रता काय आहे?

    अर्जदार हा भारतीय नागरिक असावा, त्याचे वय १५ ते ४५ वर्षांच्या दरम्यान असावे आणि तो किमान १०वी उत्तीर्ण असावा. बेरोजगार तरुण किंवा शिक्षण अर्धवट सोडलेले विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात.

    प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत प्रशिक्षण घेतल्यावर रोजगार मिळतो का?

    अनेक उमेदवारांनी प्रशिक्षणानंतर चांगल्या कंपनीत नोकऱ्या मिळवल्या आहेत, तर काहींनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. रोजगाराची हमी नसली तरी, कौशल्यामुळे संधी निश्चितच वाढतात.

    Photo of author

    लेखकाबद्दल

    साहिल घिवे

    मागील दहा वर्षांपासून डिजिटल सेवा क्षेत्रात कार्यरत असून, एक अधिकृत Mahaonline VLE आणि अनुभवी Aadhaar Supervisor म्हणून हजारो नागरिकांना ऑनलाईन सेवा आणि आधार संबंधित मदत पुरवली आहे. स्वतःचे Mahaonline केंद्र चंद्रपूर जिल्ह्यातील, गोंडपिपरी शहरात असून, केंद्राच्या माध्यमातून विविध शासकीय योजना, दाखले, पॅन कार्ड, आधार अपडेट, व इतर अनेक सेवा लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. आणखी वाचा

    Leave a Comment

    WhatsApp Icon
    व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करा !