गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना: महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे जीवन खूपच कष्टमय आणि धोकादायक असते. पेरणीपासून कापणीपर्यंत, प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या जीवनाला अपघाताचा धोका असतो. अनेकदा अशा अपघातांमध्ये शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा त्यांना गंभीर अपंगत्व येते.

अशा कठीण प्रसंगी शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकारची गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना महत्त्वपूर्ण ठरते.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुधारणा करून, सन २०२३-२४ पासून “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना” राबविण्यास १९ एप्रिल २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
ही योजना दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आली आहे, जे शेतकरी कल्याणासाठी कटिबद्ध होते. शेतकऱ्याच्या अपघाती मृत्यू किंवा अपंगत्वामुळे त्याच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळते. अशा वेळी सरकारकडून तातडीची सानुग्रह मदत मिळाल्यास त्या कुटुंबाला नव्याने उभं राहता येत, हीच या योजनेची मूलतत्त्वं आहेत.
हे सुद्धा वाचा: PM Kisan 20th Installment: पीएम किसान 20 वा हप्ता जूनमध्ये येण्याची शक्यता; ही ३ काम राहिली असल्यास हप्ता मिळणार नाही!
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०२५-२६ साठी मोठी आर्थिक तरतूद
महाराष्ट्र शासनाने ९ जून २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये या योजनेसाठी मोठी आर्थिक तरतूद केली आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात, सन २०२४-२५ या वर्षातील ३०५० प्रलंबित दाव्यांसाठी (ज्यात २९७८ मृत्यू प्रकरणे आणि ७२ अपंगत्व प्रकरणे समाविष्ट आहेत) रु. ६०.३५ कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. हा निधी कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना वितरीत करण्यात येईल.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना कशी कार्यान्वित होते?
या योजनेअंतर्गत तालुकास्तरीय समितीने मंजुरी दिलेले दावे निकालात काढले जातात. निधी वितरणाची जबाबदारी आयुक्त (कृषी), महाराष्ट्र राज्य यांची राहील. त्यांना निधीच्या विनियोगाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करावे लागेल.
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, आयुक्त (कृषी) हे आयुक्तालय स्तरावर नियंत्रण अधिकारी असतील, तर सहाय्यक संचालक, लेखा-१, हे आहरण व संवितरण अधिकारी (DDO) म्हणून घोषित करण्यात आले आहेत. जिल्हा स्तरावर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे नियंत्रण अधिकारी आणि त्यांच्या कार्यालयातील लेखाधिकारी हे आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
हे सुद्धा वाचा: राज्यात प्रत्येकाला मिळणार हक्काचे घर; ३० लाख घरकुल मंजुर, महाराष्ट्र सरकारची घोषणा!
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना कोणासाठी आहे?
ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी लागू आहे, ज्यांना अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आले आहे. संबंधित व्यक्तीच्या अपघाती निधनामुळे किंवा अपंगत्वामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाते.
शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्याच्या कुटुंबावर संकट ओढवले, तर त्यांना उभ राहण्यासाठी मदतीचा हात दिला पाहिजे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आधार देऊन त्यांना नव्याने आयुष्याला सामोरे जाण्याची शक्ती देते. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीत एखादा शेतकरी या योजनेच्या पात्रतेत येत असेल, तर संबंधित कृषी कार्यालयाशी त्वरित संपर्क साधा.
शासन निर्णय
या लेखात दिलेली माहिती महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने जारी केलेल्या शासन निर्णय क्रमांक: गोमुंअ-२०२५/प्र.क्र.१४१/११-अे, दिनांक ०९ जून, २०२५ वर आधारित आहे.
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) उपलब्ध असून, त्याचा संगणक सांकेतांक २०२५०६०९१७४१०२९६०१ असा आहे.
मूळ शासन शुद्धिपत्रक पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा 👇