MahaDBT Solar Pump Scheme: राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक चांगली बातमी आहे. शेतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या सौर फवारणी पंपासाठी, राज्य शासनाकडून विशेष अनुदानाची सोय करण्यात आली आहे. ही योजना महाडीबीटी पोर्टलवर राबवली जात असून, 2025 पासून अधिक प्रभावी पद्धतीने, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जात आहे.

MahaDBT Solar Pump Scheme या योजनेचा उद्देश म्हणजे, शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्पादनात वाढ करावी आणि विजेवरील खर्चात बचत व्हावी. सौर ऊर्जेवर चालणारे हे पंप केवळ वीज वापर टाळतात अस नाही, तर पर्यावरणालाही हानी पोहोचत नाही. त्यामुळे अशा योजना काळाची गरज ठरत आहेत.
कोणाला किती लाभ मिळणार?
शासनाने या योजनेअंतर्गत, काही विशेष गटांसाठी जास्तीत जास्त मदत जाहीर केली आहे. महिला शेतकरी, अनुसूचित जाती-जमातीतील बांधव, लहान भूधारक किंवा मर्यादित जमीनधारक, यांना या पंपाच्या किंमतीपैकी ५० टक्क्यांपर्यंत किंवा ₹१८०० पर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. इतर सर्व पात्र शेतकऱ्यांना, ४० टक्के किंवा ₹१५०० पर्यंतचे अनुदान दिले जाईल.
या मदतीमुळे, शेतकऱ्यांच्या खिशावर ताण न येता त्यांना अत्यावश्यक साधन परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार आहेत.
सौर फवारणी पंप म्हणजे काय?
सध्या बऱ्याच भागांमध्ये वीजेची अनियमितता असते. त्यामुळे पारंपरिक पंप वापरण त्रासदायक ठरत. अशा वेळी सौरऊर्जेवर चालणारे पंप हे खूपच उपयुक्त ठरतात. फक्त सूर्यप्रकाश असला की हे पंप काम करतात. इंधन किंवा बॅटरी चार्ज करण्याची झंझटच नाही. त्यामुळे पिकांवर फवारणी करताना, येणारा खर्च लक्षणीयरित्या कमी होतो.
शिवाय, यामुळ कार्बनच उत्सर्जनही होत नाही, म्हणजे पर्यावरणाचे संरक्षणही होते.
पात्रता काय लागते?
MahaDBT Solar Pump Scheme ही योजना सगळ्यांनाच लागू होत नाही. यासाठी काही अटी आहेत. शेतकऱ्याचा शेतावर मालकी हक्क असण आवश्यक आहे. Farmer ID अनिवार्य आहे.
तसेच ज्यांनी याआधी कृषी यांत्रिकीकरण योजनेचा किंवा फवारणी पंप योजनेचा लाभ घेतलेला नाही, असे अर्जदारच या नव्या योजनेसाठी पात्र ठरतात.
MahaDBT Solar Pump Scheme साठी अर्ज करताना लागणारी कागदपत्र
या योजनेसाठी अर्ज करताना आधार कार्ड, ७/१२ व ८-अ उतारे, बँक पासबुक, मोबाईल नंबर, आणि Farmer ID आवश्यक आहे. जर जमीन इतर कोणाच्या नावावर असेल, तर इजारा किंवा वारसाचा दाखला लागू शकतो.
अर्ज कसा करायचा?
महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर – mahadbt.maharashtra.gov.in जाऊन सर्वप्रथम लॉगिन करायच. जर तुमच्याकडे Farmer ID नसेल, तर आधी तो तयार करा. मग तुमच प्रोफाईल पूर्ण करून ‘कृषी यांत्रिकीकरण’ विभाग निवडावा. तिथे ‘सौर नॅपसॅक फवारणी पंप’ या योजनेचा पर्याय निवडून ₹२३.६० इतकी अर्ज फी भरून फॉर्म सबमिट करावा.
जर याआधी बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी अर्ज केला असेल, तर तो आधी रद्द करण गरजेच आहे. अन्यथा नवीन अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
2024 आणि 2025 मध्ये काय फरक?
2024 मध्ये काही जिल्ह्यांमध्ये कापूस आणि सोयाबीन पिकासाठी battery-operated पंप मोफत देण्यात आले होते. मात्र त्यावेळी लॉटरी पद्धत वापरण्यात आली होती. 2025 मध्ये योजनेच्या अटींमध्ये सुधारणा करून, लॉटरी प्रक्रिया रद्द करण्यात आली असून, पात्र शेतकऱ्यांना थेट लाभ देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
काही अडचण असल्यास…
जर तुम्हाला अर्ज करताना अडचण आली, किंवा काही शंका असल्यास, mahdbt.maharashtra.gov.in या वेबसाइटवर भेट द्या किंवा 022-6131-6429 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा.
शेवटी एक सांगायच…
MahaDBT Solar Pump Scheme या योजनेचा लाभ फक्त अनुदानापुरता मर्यादित नाही. ही योजना शेतकऱ्यांच्या हातात ऊर्जा स्वावलंबन देणारी आहे. वीज खर्च कमी करणे, उत्पादन वाढवणे आणि पर्यावरण राखणे – हे सगळं एका छोट्याशा पंपामुळं शक्य होतं. म्हणूनच, सरकारनं जाहीर केलेल्या या संधीचा फायदा घेण्यासाठी आजच अर्ज करा.
FAQs: वारंवार विचारले जाणारे प्रश्न
महाडीबीटी सौर फवारणी पंप योजना म्हणजे काय?
ही योजना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवली जाते. यामध्ये शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणारे फवारणी पंप अनुदानित दरात उपलब्ध करून दिले जातात, जे कीटकनाशके किंवा पोषक द्रव्ये फवारण्यासाठी वापरले जातात.
या योजनेसाठी पात्रता काय आहे?
अर्जदार शेतकऱ्याजवळ वैध फार्मर आयडी असावा, त्याच्या नावावर शेतीची नोंद असावी आणि याआधी अशा यंत्रसामग्री योजनेचा लाभ घेतलेला नसावा. याशिवाय, अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक असते.
योजनेत किती अनुदान मिळते?
शेतकऱ्यांनी महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahadbt.maharashtra.gov.in) जाऊन लॉगिन करावे, योजना निवडून आवश्यक माहिती भरावी आणि ₹23.60 इतकी फी भरून अर्ज सबमिट करावा.
योजनेत 2025 पासून काय बदल झाले आहेत?
2025 मध्ये लॉटरी पद्धती रद्द करून थेट पात्र अर्जदारांना सौर पंप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता लाभ अधिक थेट व पारदर्शक पद्धतीने मिळणार आहे.